Wednesday, December 23, 2009

वैशाली पाटील, जबलपुर

Tuesday, December 22, 2009

बरच काही

दिवस उजाडतो, बरच काही करायचे असतं

दिवस मावळतो, बरच काही करायचे राहुन गेलेले असतं

आयुष्य असेच निरर्थक पुढे सरकत राहिलेले .

कशाला उद्याची बात !

उद्याला आता काय ?

पुण्याचे कलावंत हे साऱ्या विश्वात सरस, Best in the whole world , या वर राजाभाऊंचे मत ठाम.

उद्याचा पुण्याच्या स्वरश्री देव,  ईशा देशपांडे व पायल उंब्रानी यांचे कथ्थक चुकवुन चालणार नाही.

गेल्या वर्षी पायल उंब्रानी यांचा झालेला हा कार्यक्रम

लोक काय दोन्ही तोंडाने बोलतात.

नितीनभाऊ मंत्री असतानां, त्यांनी मुंबईमधे "चौक तेथे उड्डाण पुल " बांधण्याचा चंग बांधला आहे, राज्याची तिजोरी पुल बांधण्यात  रिकामी करत आहेत,  राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे करुत लोक टीका करत असत.

आणि आता,

नितीनभाऊंनी मंत्री असतांना त्यांनी अनेक ठिकाणी उड्डाण पुल बांधले , वगैरे वगैरे.

स्वामी हरीदास संगीत संमेलन -दिवस ११ वा


एखादा दिवस असा येतो की जो तुम्हाला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ट कलाकृती देवुन जातो, डोळ्याचे पारणे फिटते, एक आगळे समाधान देवुन जातो.

वैभव आरेकर व केतकी जोशी यांनी सादर केलेले भरतनाट्यम, दशावतार. असे पुन्हा होणे नाही.

आतापर्यंत ओडीसी नृत्य व्यवस्थीत पहायला मिळालेच नव्हते, ती कसर आज भुवनेश्वरच्या स्मॄतीरेखा त्रिपाठी यांनी भरुन काढली, अप्रतिम, केवळ हाच शब्द.

हे दोन कार्यक्रम बघुन झाल्यानंतर आता कथ्थक नेहमीचेच, ते काय बघायचे (क्षमा असावी ), चला निघुया असा राजाभाऊंने विचार केला. पण पाहु तरी कोण आहे म्हणता म्हणता, ते खुर्चीला खिळुन राहिले. जबलपुर वरुन आलेल्या वैषाली पाटील यांनी तर कमाल केली.  वा , क्या बात है.















Monday, December 21, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दहावा

कृष्ण कृपा सागरा , आनंद , आनंद, आनंद .

हा संमेलनाचा ज्वर आता असह्य होवु लागला आहे. झोपेत पण कार्यक्रम दिसु लागले आहेत.

आज धमाल आली. श्रीमती लता सुरेंद्र आणि त्यांच्या १८-१९ शिष्येंनी भरतनाट्यम बॅले सादर केले. जवळजवळ दिड तास हा कार्यक्रम चालला. त्याच्या नंतर त्यांच्याच एका शिष्येने , चैत्रा शेट्टीने भरतनाट्यम सादर केले.

आजच्या कार्यक्रमाची सुरवात कोलकता वरुन आलेल्या स्वागता बॅनर्जी हिच्या ओडीसी नॄत्याने झाले, त्यानंतर लखनौच्या गौरव शर्माचे कथ्थक झाले.

मुंबईच्या संगिता राजन व अनु नारायण यांचे ओडीसी नृत्य झाल्या नंतर पुढचे कार्यक्रम बघायचे त्राण राजाभाऊंना राहिले नाही.










ता.क. चांगल्या कॅमेराची राजाभाऊंना आत्यंतीक गरज आहे.

Sunday, December 20, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस नववा.

एकीकडॆ झाकीर हुसेन आणि कं. यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला आहे आणि त्याच वेळी दुसरीकडॆ देशभरातुन आलेल्या नवोदीत, गुणी तरूण कलावंत "स्वामी हरीदास संगीत संमेलन मधे आपली कला सादर करत आहेत.

अश्यावेळी  राजाभाऊंनी कोणाला प्राधान्य दिले असेल ?

आपले नेते प्रांतीयपणा वरुन राजकारण करत, लोकांच्या भावनांशी खेळत, भडकवत स्वःताच कार्यभाग साधुन घेत असतात, त्याच वेळी कलेच्या प्रांगणात कलकत्ताचा राहुलदेव मोंडल मुंबईमधे दक्षिणेकडचे भरतनाट्यम सादर करण्यासाठी येत असतो.





आजचा दिवस गाजवला तो राहुलदेव नी.  अंग लवचीक असावे तरी किती. त्यानी म्हणण्यापेक्षा आज जणु प्रत्यक्ष शिवानेच रंगमंचावर त्याच्या रुपाने येवुन  शिव तांडव सादर केले असे म्हटले तर ती अतिशोयक्ती ठरु नये. 

त्याच्या आधी दिल्लीवरुन आलेल्या मोमीता घोषनी ओडीसी नृत्य सादर केले होते. ते पहाण्यासाठी राजाभाऊ आज पुण्याहुन खुप लवकर निघाले, पण . हुकायचे ते हुकलेच.

मग गोरखपुर वरुन आलेल्या सुजया घोष व वाराणशी वरुन आलेल्या स्वेता चौधरी यांचे कथ्थक नृत्य झाले.



नंतरचे कार्यक्रम बघण्यासाठी आज राजाभाऊंकडॆ एनर्जी शिल्लक रहिली नव्हती.

खर तर त्यांनी शेवट पर्यंत थांबायचे होते.

आता प्रतिक्षा उद्याची.





तेरे गुलाबी गालोंका जी करता है रंग चुरा लूँ , आ तेरी तस्वीर बना लूँ !

बाल हैं बादल जैसे काले


सागर से नैना मतवाले

तेरे गुलाबी गालों से

जी करता है रंग चुरा लूँ

आ तेरी तस्वीर बना लूँ ...

अरे वेड्या ही पानगळती नव्हे !

शाख़ो सें बर्गे-गुल नहीं झड़ते है बाग़ में
जे़वर उतर रहा है अरुसे बहार का । - अमीर मीनाई.


१२ ला असतांना मराठी विषयाच्या पुस्तकात श्री.नरेंद्र सिंदकर यांच्या "क्रेमलीनच्या बुरुजावरुन " या पुस्तकातील एक प्रकरण होते, त्यातला हा शेर डोक्यात घुसुन राहिला होता.

इतकी वर्षे तो आठवत नव्हता पण त्याचा मतितार्थ अंधुकसा आठवत असे, आज तो शेर सापडला.


अरे वेड्या,  ही पानगळती नव्हे, या फुलांच्या पाकळ्या निरर्थक गळुन पडत नाहे आहेत,  जणु नववधु मिलनाच्या ओढीने तयार हॊतांना,  केलेला सर्व साजशृंगार उतरवुन ठेवत आहे.  

Gargoyles and others

Thursday, December 17, 2009

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा


किसनगढ वरुन आलेल्या संत सतनाम सिंग यांचे गाणे ऐकणॆ गेल्या वेळी हुकले होते. आज ते ऐकायचेच करत राजाभाऊ लवकर पोचले.


त्यांच्या नंतर भोपाळ वरुन आलेल्या श्रुती  अधिकारी यांचे संतुर वादन व इंन्दौरच्या चित्रगणा अग्ले यांचे पखावज वादन झाले.




कलकत्यावरुन आलेले श्री. सुदीप भटटाचारजी यांचे गायन व वाराणाशीच्या अतुल शंकरचे बासुरी वादन ऐकुन ते आज घरी लवकर परतले.

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा


आज असे काय घडले ज्यामुळे राजाभाऊंच्या हाती औचीत्यभंगाचा प्रमाद झाला. समोर चाललेला पुरीया धनश्री ऐकायचा सोडुन ते दुसऱ्यांना डिस्टब करत "त्या"  ओळख करुन दिलेल्या व्यक्‍तीशी बोलतच राहिले, बोलतच राहिले, बोलतच सुटले. 

" हे मेंडोलीन वाजवतात. "

(संपुर्ण जगात केवळ एकच  मेंडोलीन वादक ते जाणतात , हो सर्वश्रेष्ठ आहे ( साऱ्या भक्‍तांना असेच वाटत असते काय ? ) हे वाक्य ओठापर्यंत आलेले त्यांनी थांबवले , उगीच त्यांना वाईट वाटायला नको )

आपण ज्याला भजतो त्यांना भेटणे नशीबी नव्हते पण आज त्यांच्या मुलाशी ओळख झाली हे ही थोडके नसावे. 

सज्जाद हुसेनच्या मुलाशी आज राजाभाऊंची ओळख झाली, मग काय त्यांच्या वाणीला बहर आला, ते येवढे उत्तेजीत झाले कि त्यांच्या ओठावर असलेली सज्जादची गाणी देखील त्यांना आठवेना. " सैया आणि फक्त सैया " आठवत राहिले.

होता है कभी कभी ऐसाभी होता है !


भीती वाट्ते

भीती वाटते जर का हा असा थंडा प्रतिसाद मुंबईकर जर का देवु लागले तर मग हे कलावंत हळु हळु या संमेलनाला येणे कमी करु लागतील.

ओडीसी संगीत - स्वामी हरीदास संगीत संमेलन. दिवस पाचवा.



काय हो राजाभाऊ, तब्येत तर ठीक आहे ना, आता पर्यंत हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीताबद्द्ल ऐकले होते, पण हे नवीनच ओडीसी संगीत कुठुन आले ?


अहो तुम्ही भुवनेश्वर वरुन आलेल्या श्रीमती संगीता गौसेन यांचे गाणे ऐकले असते ना तर तुम्हाला कळाले असते हा काय प्रकार आहे तो, नेमके दोन्ही कॅमेरे आजच मोडायचे होते, नाहीतर तुम्हाला ऐकवले असते किती माधुर्य होते या गाण्यामधे ते.

आणि काय हो राजाभाऊ,  आतापर्यंत तुमचा झालेला आणखीन एक गैरसमज दुर झाला असेल ना. वाटत होते धृपद संगीत भारतातील  फक्‍त काही भागापुरते सीमीत आहे पण कोलकतावरुन आलेल्या श्रीमती रंजीता मुखर्जी व त्यांच्यानंतर झालेल्या श्री. दुर्गा शंकर अचीर्जी यांच्या गाण्यानी दुर झाला असेल ना.

हो ना.

आज वेळॆ अभावे दोन चांगले कार्यक्रम हुकले.

भुवनेश्वरच्या गुरु सचीनानंद दास यांचे मरडल वादन व कलकत्ताच्या बुद्धदेव मन्ना व लातुरचे श्री. गोपाळ जाधव यांचे तबल व पखवज याची जुगलबंदी.

Wednesday, December 16, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस चवथा

किसीके दिल मे प्यास पैदा कर देना और फिर उसे बुझाये बीना अधुरी छोड देना.

हाय !.

हा दिवस गाजवला तो म्हैसुर वरुन आलेले समीर राव यांची बासुरी आणि कोलकताचे श्री. अभिषेक अधिकारी यांची सतार यांनी.

काय रंगली होती ही जोडी   राग चंद्रकंसांत.

आ हा. बहार आली. वा भाई वा.  बहुत खुब.

काश समयकी पाबंदी न होती.

जे कार्यक्रम लवकर  संपायला हवेत ते संपता संपत नाही आणि जे कार्यक्रम संपु नये असे वाटत असते ते कलावंतांना दिल्या गेलेल्या वेळेमुळे संपवावे लागतात.

Tuesday, December 15, 2009

वाईट फारच वाईट








कोलकता व अमेरिकस्थीत पं. देबी प्रसाद चटर्जी आपला सतारवादनाचा कार्यक्रम करायला मुद्दामुन अमेरीकावरुन मुंबईत आले आणि हा मुंबईनी त्यांना दिलेला थंडा प्रतिसाद.

चुकी कोणची ?

हा महोत्सव लोकांपर्यंत पोचतच नाही. दर वेळेची तीच रड.  दुरदुरच्या प्रदेशातुन आलेल्या सर्व  कलावंतांना रिकाम्या खुर्चींपुढे आपली कला पेश करायला लागते याचे राजाभाऊंनी फार दुःख होते.  किती हौशेनी हे सर्व जण मुंबईत येत असतील

 कलावंताना काहीतरी रसीकांना सांगायचे असते , आपल्या भावना या संगीताद्वारे समोर असलेल्या श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या असतात, कलेमधुन आपल्याला जो आनंद मिळातो तो त्यांना वाटायचा असतो, या द्वारे मिळणाऱ्या आंतरीक समाधानामधे त्यांना कोणालातरी सामील करुन घ्यायचे असते. त्यांची कला ही जशी त्यांच्यासाठी असते त्यांच्यापेक्षा जास्त ती रसिकांसाठी असते.

पण. समोर कोणीच नसेल तर ?

हे सारे दुःख मनाशी घेत कार्यक्रमाचा आस्वाद घेणे फार कठीण जाते.

या मैफिलीत पंडीतजींनी राग चारुकेशी वाजवला . त्यांनी अप्रतिम साथ केली पं.मदन मिश्रा यांनी.

बहार आली.

ही बहार सर्वांपर्यंत पोचावी असे राहुन राहुन वाटते.

हेची दान देगा देवा

देवा , दुसरे काहीही मागणे नाही. फक्‍त गाढ , सुखद निद्रा रोज लागो, अगदी अशीच.


भावमुद्रा - पं. विश्वनाथ -



दिवस तिसरा.

दिल्लीवरुन आलेले पंडीतजी राग जोग गायले.

पुण्याच्या डॉ.सुहासीनी कोरटकर यांचे गाणे ऐकण्याचा योग काय अजुन पर्यंत जुळुन येत नाही आहे.

पोचायला उशीर झाला.


Sunday, December 13, 2009

संचारी बक्षी - सतार -बागेश्री

स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दुसरा


आज संचारी बक्षी यांचे सतार वादन ऐकले. राग बागेश्री त्यांनी बढीया वाजवला. मजा आली.

अलाहाबाद वरुन आलेल्या श्री. प्रशांत कुमार, समीत कुमार मालीक व कौशीक कुमार यांचे धृपद  व पखावज वादन उशीरा पोचल्याने हुकले.