Saturday, November 07, 2009

नुसता जीवाला त्रास होतो

मन नुसत जळतय. या राजाभाऊंनी आयुष्य कधी गंभीरपणॆ घेतलेच नाही.

 पुण्यात एकेका विभागात पायी हिंडत असता एकेकांची घरे, बंगले किंवा तो एरीया बघुन  जीवाला त्रास होतो, आपण कधीच पुढचा विचार काय किंबहुना विचारच कधी केला नाही याचा.  आणि विचार केलच तर तो अंमलात आणॆपर्यंत जग फार पुढे निघुन गेलेले असते याचा.

राजाभाऊंची एक सवय आहे , बायकोला घेवुन शहरात मग ते कोणतेही असो,  पायी हिंडुन फिरत पहाण्याची.  त्या शिवाय ते शहर कळत नाही असा त्यांचा सिद्धांत..  एखादा विभाग घ्यायचा मग पाय नेतील तेथे कुचे , गलीयां मधुन स्वत:ला वाहवत न्यायचे.

आज संध्याकाळी घरकुल लॉन मधुन ते मग चालता चालता पटवर्धन बागेत शिरले आणि मग पुढे जात नवसह्याद्रीतुन बाहेर पडले.  काय मस्त परिसर आहे.

काश .....

किस गहरी सोच मे डुबे हुवे हो भाई


ज्याचे पाय एवढाले त्याला पादत्राणॆ कैसी ?


लागी रे ये कैसी अनबुझ आग , मितवा, मितवा , मितवा नही आये


राजाभाऊ आणि वहातुक पोलीस हवालदार

राजाभाऊंनी काल वाशी येथे पुलाखाली एका वहातुक पोलीसाला एक साधा, सोपा, सरळ प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर त्या दोघांनाही ठावुक होते.

"काय हो तुम्ही बाहेरुन येणारी गाडी, प्रवासी घ्यायला थांबली की लगेच त्यांना पकडता , पण या येथे समोर कोपऱ्यावर राजरोसपणे ह्या खाजगी गाड्या प्रवासी भरण्याचा  बेकायदेशीर धंदा करतत, अगदी तुमच्या समोर हे एजंट लोक ’पुणॆ, पुणॆ " करत ओरडत असतात , त्यांना तुम्ही काहीच करत का नाहीत ? "

राजाभाऊंच्या तोंडाकडॆ ते हवालदार बघत राहिले व  काहीही न बोलता पुढे निघुन गेले.


वाशी ते पुणॆ , एशियाड , वोल्वो सेवा,  महामंडळाने उपलब्ध करुन दिली तर (चांगल्या न खडखडणाऱ्या गाड्या)  ! , दादर - पुणे च्या धर्तीवर वाशी-पुणे योग्य दरात टॅक्सी सेवा सुरु झाली तर !

कशाला प्रवासी या धोकादायक आणि अव्याच्यासवा दर सांगणाऱ्या, मेंढरे भरल्यागत गाडीत माणसे कोंबणाऱ्या खतरनाक माणसांच्या नादी लागतील ?    

आज गोंधळ कोण घालणार ?

आज शपथविधी समारंभात  गोंधळ कोण घालणार ? 

जांबुवंतराव घोटॆंची जागा आमचे आमदार पैलवान श्री. रमेश वांजळॆ घेणार काय ? 

राज साहेबांनी सर्व आमदारांना दम भरला आहे, मराठीतुन शपथ घ्या नाहीतर !!

पुणे आणि " पुन्हा बहरली डौलदार बाग "

विद्युल्लेखा अकलूजकर यांचा " पुन्हा बहरली डौलदार बाग " हा साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातला लेख वाचल्यानंतर राजाभाऊंनी एक नवेच वेड लागले आहे, पुण्यात फिरतांना दुरावस्थेतल्या बागा, उद्याने , मैदाने न्याहाळायची व पुण्यातील बागकामाची आवड असणाऱ्या असंख्य प्रेमींनी जर मनावर घेतले तर यांचा देखणा कायापालट होवु शकतो या विचाराचे.

सध्या दोन जागा पहाण्यात आल्या आहेत. औंध मधे सानेवाडीतले मैदान व अलका कडुन दांडेकर पुलाकडॆ जातांना असलेल्या काका हलवाईंच्या दुकाना मागील एक उद्यान.


कॅनडातील एका स्थानीक प्रशासनाला पुरेश्या निधी अभावी "पॉलीक पार्क " या भव्य बागेची देखभाल करणॆ कठीण जात असते, बागेची वाईट अवस्था बागकाम प्रेमींनी बघवत नाही. अश्या वेळी लेखिका व "रिचमंड गार्डन कल्ब " चे सदस्य पुढाकार घेवुन "पॉलीक पार्क " ला दत्तक घेतात व प्रशासनाच्या मदतीनी पार्कचा कायापालट करता, नवसंजीवनी मिळवुन देतात. या अनोख्या प्रयोगाची माहिती देणारा का लेख.

जेव्हा प्रशासन व नागरीक एकत्र ऐवुन एखादा प्रकल्प राबवतात तेव्हा त्यातुन एक नव निर्माण होत असते.
  
असे प्रयोग आपल्याला पुण्यातही कैक ठिकाणी करता येतील.

Thursday, November 05, 2009

सरकारची गरजच काय ?


अलीकडॆ कुठेतरी एक लेख वाचनात आला होता.

नाहीतरी राज्यकारभार प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकारीच करतात, या अश्या नेत्यांऐवजी त्यांच्याच ताब्यात राज्य देवुन त्यांना राज्यशकट चालवायला द्या, ते अधिक चांगल्या रितीने राज्य चालवु शकतील असा काहीसा त्याचा मतितार्थ होता.

लेखकाचे मत पटले.

राजाभाऊ आणि उकडीचे मोदक


राजाभाऊंच्या  उत्तराने त्या बाईंनी एकदम चमकुन त्यांच्याकडॆ पाहिले  व काहीही न म्हणता त्यांनी पुढे केलेल्या ताटलीत त्यांनी सातवा मोदक वाढला.

"अजुन किती देवु ?  " हा त्यांचा प्रश्न.

स्थळ कोकण महोत्सव, मागोठणॆ आगार.  त्या स्टॉलवर उकडीच्या मोदकाचा खासा बेत.

" जो पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत "  राजाभाऊंनीं त्यांना सांगितले.

आणि राजाभाऊंनी त्या दिवशी आपला शब्द खरा केला आणि मग ओशाळलेल्या राजाभाऊंनी मी नुकताच तापातुन उठलोय, गेले दोन दिवस उपाशी आहे , हा खुलासा केला.

 ( तरी पण काय झाले ? हा बकासुरी बाणा ? )

आज सकाळ पासुन त्यांच्या बायकोचे चार फोन , तु येथे असायला हवा होतास, आज संकष्टी. मी उकडीचे मोदक केले आहेत.

मग ते वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी तांबेंकडॆ गेले, " मोदक संपले"  हे ऐकुन घ्यायला.

नशिबाने "कोल्हापुरी चिवडा " मधे त्यांना ते मिळाले.

दोन मोदक खाल्यानंतर त्यांना मालकांनी विचारले , "कसे झाले आहेत ?"

"आणखीन एखादा खावासा वाटतो " - इती राजाभाऊ.

एक मागितला तर वेटरनी प्रेमाचा आग्रह करत दोन मोदक आणुन दिले.

कठीण आहे.

बाप्पा तुची भक्‍तांना बिघडवीसी !   

टाळ्या - येवु घातलेल्या सरकारसाठी


एखादा कार्यक्रम सुरु व्हायला उशीर झाला की ताटकळत बसलेलेले, कंटाळलेले प्रेक्षक उपहासाने टाळ्या वाजवुन कार्यक्रम लवकर सुरु करण्याचे आव्हान करु लागतात.

आत या By Default  आलेल्या सरकारसाठी काय वाजवायचे ?

Wednesday, November 04, 2009

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची.

कवितेच्या फारश्या वाटेला न जाणाऱ्या राजाभाऊंनी काल रहावेना, काय करणार ज्या कवींवर तो कार्यक्रम होता ते पहाता न चुकवुन चालण्यासारखे नव्हते.

सृजन निर्मीत "एक दिव्य काव्यानुभव कवी रॉय किणीकर "

वैशाली उपाध्ये, शैलेश दाणी आणि श्याम माधव धोंड यांनी एक अप्रतिम काव्यानुभव सादर केला.

मजा आली.

ती आणि त्रिपुरी पोर्णिमा


१९७८-७९ चा काळ, श्री.सोमनाथ समेळांनी रायगड प्रदक्षिणा आयोजीत केली होती. राजाभाऊंची ही पहिली सह्यमोहीम.  नेमकी त्याच रात्री त्रिपुरी पोर्णिमा होती.

प्रदक्षिणा घालतांना त्या अरुंद वाटॆवर ती पुढे चालली होती, चालता चालता तिला त्यांचा पाय लागला, ते सॉरी  म्हणाले. 

"ट्रेकवर या असल्या फॉर्मलिटीज पाळायच्या नाहीत "

तिने बजावले. ती ग्रुप  लिडर होती.  त्या गर्दीत परत, परत तीन चार वेळा याचे पुनरावृती झाली.

तिला वाटॆल हा मुद्दाम पाय मारतो की काय , म्हणुन ते पुढे निघुन गेले. आता लाथा खाण्याची व हा डायलॉग मारण्याची त्यांची पाळी होती.  सवयीने ती पण नकळत सॉरी म्हणुन गेली.

" का हो आता का ?  "  अणि  मग दोघे खळखळुन हसले. त्यांना एक चांगली मैत्रीण मिळाली, 

छानपैकी त्यांच्या चार पाच जणांच ग्रुप जमला,  मग त्या चांदण्यारात्री त्यांनी रायगड चढायचे ठरवले, टपोरे लख्ख चांदणे ,  संपुर्ण किल्ला त्या चंद्रपकाशात पाहुन झाला, रात्र, पहाट मोहमयी होती.

तिच्यामुळे या गिर्यारोहणाच्या दुनियेची त्यांना माहिती मिळाली, ते भटकंतीस जावु लागले.

दरम्यान ती लग्न होवुन परदेशी गेली, त्यांचा संपर्क टुटला.

मग अचानक कधीतरी त्यांना कळाले , बाळंतपणात मुलाला जन्म देवुन ती हे जग सोडुन गेली.

दर वर्षी त्रिपुरी पोर्णिमेला हे दिवस आठवतातच.

Tuesday, November 03, 2009

माननीय राजसाहेब

आई एकवीरा आपली कुलदेवता. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर प्रथम आईच्या दर्शनाला , तिचा आशिर्वाद घ्यायला आपण आपल्या तेरा आमदारांना घेवुन गेलात.


त्या कार्लागडाचे माझ्या लहान पुतणीने काढलेले हे फोटो,

या आईच्या निवासस्थानाची तिच्या भक्तगणांनी वाट लावली आहे. साऱ्या डोंगरावर प्लास्ट्किच्या पिशव्यांच्या, कापलेल्या कोंबड्यांच्या पिसांचा, नारळाच्या शेंब्यांचा, कचराचा विळखा बसला आहे.

आपल्या कुलदेवतेच्या गडाचे रुप आपल्या आदेशाने पालटो ही आईच्या चरणी प्रार्थना. ह्या देवळाचे स्वरुप, रुप, रंग देखील बदलण्याची गरज आहे. काय त्या देवळाभोवती कोणताही विचार न करता विद्रुप लोखंडी जाळ्यांचे पिंजरे उभारले आहेत, काय तो देवळाला रंग फासुन ठेवला आहे.

या कार्लापरिसराचे , तिथल्या अद्वितीय, प्राचीन, साऱ्या जगात या प्रकारची एकमेव असलेल्या बौध्द लेण्याचे भान ठेवुन नुतनीकरण करणे फार आवश्यक आहे.

आपण मनावर घेतले तर हे होण्यासारखे आहे.

डोंगर उतारावरील नवी शेती - प्लॅस्टीक, कागदे, नारळ्याच्या शेंब्या, आणि कोबड्यांची पिसे यांची




 (खास एका मातबगार घराण्यासाठी, ज्यांचे कुलदैवत आई एकवीरा देवी आहे, त्यांना आवाहन. )


आपल्या कुलदेवतेच्या स्थानाचे नवनिर्माण के्व्हा व्हायचे ? किंवा या डोंगराचे सुंदर , रमणीय फोटॊ केव्हा काढले जातील?

पायथ्यापासुन वरती देवळापर्यंत , सन्माननीय भक्‍त, समस्त हार, ओटीचे सामान विकणाऱ्यांनी हा आईचा गड अश्या रितीने मोठ्या हौसेने सजवलाय, नटवलाय.

कार्लागडाचा आतातरी कायापालट व्हावा.

(हे पुर्वी लिहीलेले )

Monday, November 02, 2009

होणार होणार, सबुरी ठेवा

महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष नाहक कोकलत राहीले आहे, निकाल लागुन येवढे दिवस झाले तरी अजुन सरकार स्थापन होण्याची लक्षणे काही दिसत नाहीत.

त्यांना दिसत नाही काय सर्व नेतेगण किती व्यस्त आहेत ते, आपला अतिथिधर्म पाळण्यात.

हे जागावाटपाचे, खातेवाटपाचे काय केव्हाही फुरसत मिळाली की बघता येइल, सरकार वेळ आली की राज्याला मिळेलच, जाते कुठे. पण आलेल्यांची सेवा उत्तम रितीने व्हायलाच पाहिले, त्यांची कॄपादॄष्टी असेल तर एकदा काय दोनदा काय, अनेक वेळा पॉवर मिळेल.


Sunday, November 01, 2009

"आवाज" की "उत्तम अनुवाद"


एक जमाना होता "आवाज’ दिवाळी अंक केव्हा येकदा हाती येतो व त्याची मजा लुटतो असे व्हायचे पण काल समोर ’आवाज’ आणि "उत्तम अनुवाद " हे दोन दिवाळी अंक आले .


"उत्तम अनुवाद ’ वाचायला घेतला, उत्तम अनुवादीत कथांसाठी.

हा अंक मस्त आहे.

Thursday, October 29, 2009

श्याम की सूरतीया बिसरत नाही आणि "शिवार" मधे डोकवल्या शिवाय राहवेना

आज राजाभाऊंनी बढीया गाणॆ ऐकले. राग नंद आणि नायकी कानडा. दोन्ही राग आवडते. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे "महाराष्ट्र ललित कलाकेंद्र" आयोजीत श्रीमती. श्वेता हट्टंगडी-किलपाडी यांचे गाणॆ होते.

पण त्या तिथे ते एक गडबड करुन राहिले. नेमके सोबत जी.ए.कुलकर्णींनी अनुवाद केलेले व कॉनराड रिक्टर ने लिहिलेले "शिवार " हे पुस्तक घेवुन गेले.

"आता खूप दूरवर रानात भूतांच्या मेणबत्या लागल्याप्रमाणॆ सूर्याचा शेवटाचा लालसर उदास प्रकाश होता. आता तोही पुसला गेला व रान एकदम काळवंडले ... "

अरे , येथे ही याच प्रहराचे राग , डोळे पुस्तक काही सोडवेना आणि कानाला काही गाणॆ ऐकल्यावाचुन राहवेना, सालं भलतचं त्रांगडे होवुन गेले. ही उर्मी फार वाईट असते.

बा मना,  एका वेळी एकच काम कर रे, क्षणस्थ हो रे बाबा. आपल्या मनाला त्यानी दटवेले. एकावेळी दहा कामे करायला हे काही तुझे कार्यालय नाही. एकावेळी एकच.

मग पुस्तक सरळ मग पुढच्या खुर्चीवर ठेवुन त्यांनी गाण्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला.



मेरो पीया ...

Wednesday, October 28, 2009

गंमत जम्मत


महाराष्ट्र, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश. तिन्ही राज्यात निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी लागले.
हरियाणा आणि अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवुन झाली देखील, वरती विधानसभेत सरकारने  बहुमत सिद्ध करुन दाखवेल देखील.

महाराष्ट्रातील घोळ अजुन संपायला मागत नाही. राजकीय ***लीला व नौटंकीचा शेवट व्हायचा कधी ? सरकार आपल्या कामाला सुरवात करणार तरी कधी ? शपथविधीस नाताळाचा मुहुर्त धरायचा बेत आहे की काय ?

आता मात्र आपल्या साहेबांचा कंटाळा येत चालला आहे. लवकर निवृत होतील तर बरे.

Monday, October 26, 2009

ही नाही तर ती तरी, चंद्र आणि गुरु यांची युती

गेले दोन-तीन दिवस झाले आकाशात एक नाट्य रंगतेय,

तेजस्वी गुरु , चंद्रकोरीच्या जवळ जवळ येत चालला आहे.  येत्या एक दोन दिवसात त्यांची युती असावी.

Saturday, October 24, 2009

फ़िराक़

आज , आत्ता शेवटी "फ़िराक़ " चित्रपट पाहिला, जे काही दाखवले गेले आहे ते जणु घडलेच नाही असे मनाचे खोटे समाधान करत.

तू ही जब ख़ंजर-आज़मा न हुआ

इक बार दोस्तों पे ज़रा एतबार कर
फिर देख तेरी पीठ पे ख़ंजर भी आयेगा । - आबिद साबरी

हम कहां किस्मत आज़माने जाए ?
तू ही जब ख़ंजर-आज़मा न हुआ - गालिब


जनता चालवते तो ख़ंजर नसतो. ती असते मास्तरांची छडी. ( आमच्या दामले मास्तरांच्या छडीचे वळ अजुनही हातावर जाणवतात, पण एवढा मार खावुनही गणितात फक्त शुन्यच कळले ).

उघड्या डोळ्याने ती जनता काय चाललय हे पहात असते, जाणीवपुर्वक निवड व निवाडा करत असते.
गरज असते ती आत्मपरिक्षण करण्याची, झालेल्या चुका खुल्या दिलाने कबुल करायची. संघटनेच्या विचारांशी ज्यांचे देणॆ घेणॆ नाही, मागुन येवुन प्रबळ झालेले अश्यांना दुर सारुन पुर्नबांधणी करण्याची.

ग़म का तूंफॉ भी़ गुज़र ही जायेगा
मुस्कुरा देने की आदत चाहिये ।

Friday, October 23, 2009

काय गंमत आहे

दहा वर्षापुर्वीचा त्यांचा वाईट कारभार विसरायला लोक अजिबात तयार नाहीत, अजुनही त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अविश्वास आहे तर दुसरीकडॆ यांनी कसाही कारभार करो वा न करो , लोक त्यांनाच निवडुन देणार.

Thursday, October 22, 2009

शेवटी

तुम्ही गेल्या दहा वर्षात किती निष्कीयपणे कारभार करत आहेत हे महत्वाचे नाही, तुम्ही निवडणुका कश्या रीतीने मॅनेज करता ते खरं.

शेवटी जो जीता वो सिकंदर

खर म्हणजे

खर म्हणजे या पाच वर्षात एक नेता खुप काम करतांना दिसत होता, ते म्हणजे श्री. उद्धव ठाकरे.

पण ...

भावोजी , वाईट वाटुन घेवु नका

सर्व वहिनींनी आता सुटकेचा निश्वास सोडला असेल.

पैठण्या त्यांना मिळण्यापासुन त्या वंचीत झाल्या असत्या ना !